S R Dalvi (I) Foundation

हंगामी मिरची पीक लागवड संपूर्ण माहिती

Complete information on chili crop cultivation

मिरची या पिकाची मागणी ही वर्षभर चालूच असते. याकरीता भारतीय मिरचीला परदेशातूनही चांगली मागणी आहे. भारतात मिरची लागवड ही अंदाजे एक लाख हेक्‍टर शेती क्षेत्रावर केली जाते. तसेच मिरचीमध्ये जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने मिरचीला संतुलित आहार मध्ये समावेश केला जातो. तिखटपणा आणि स्वाद यामुळे मिरची महत्त्वाचे मसाल्याचे पीक असे समजले जाते.

मिरचीसाठी अनुकूल हवामान कोणते ?

मिरची साठी उष्ण किंवा दमट हवामानात अनुकूल असते. अश्या हवामानात मिरचीचे पीक अधिक चांगल्या प्रकारे येते. मिरचीची लागवड ही उन्हाळा, पावसाळा, हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये करता येते. पावसाळ्यात जास्त पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्याने फुलांची गळ जास्त प्रमाणात होते. त्यामुळे पाने व फळे कुजण्याची शक्यता असते. मिरचीची वाढ २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानाला चांगली होते आणि उत्पादन ही भरपूर प्रमाणात निघते. मिरची पिकाच्या बियाण्यांची उगवण ही १८ ते २७ डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये उत्तम प्रकारे होते.

मिरची पिकासाठी जमीन कोणती निवडावी?

पाण्याचा उत्तम निचरा होणारी मध्यम जमीन मिरची पिकाच्या लागवडीस ही अतिउत्तम असणार आहे. तसेच हलक्‍या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रिय खते वापरल्यास अती जमीन मिरचीच्या पिकास योग्य ठरू शकते. पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होत नसेल, तर त्या जमिनीत मिरचीचे पीक अजिबात घेऊ नये. मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन ही शेतकऱ्याने निवडावी. कारण त्या जमिनीत पीक उत्पादन अधिक चांगले होऊ शकते. जर तुम्ही उन्हाळ्यात या पिकाची लागवड करण्याचे विचार करत आहात, तर मध्यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. तसेच जर तुमच्याकडे चुनखडी असलेली जमीन असेल, तर त्यामध्ये ही मिरचीचे पीक खूप चांगल्या प्रकारे येते.

मिरची पिकाची लागवड कधी करायची ?

खरीप मिरची पिकाची लागवड जून, जूलै महिन्‍यात करावी.

उन्‍हाळी पिकाची लागवड जानेवारी, फेब्रूवारी महिन्‍यात करावी.

मिरचीच्या जाती आणि त्यानुसार त्यांची वैशिष्ट्ये –

पुसा सदाबहार –

पिकलेली मिरची तेजस्वी लाल रंगाची असते.

या जातीची पाने इतर जातींपेक्षा रुंद असतात आणि झाडे उंच असतात.

या जातीच्या हिरव्या मिरचीच्या सरासरी उत्पन्न हे साडेसात ते दहा टन व वाळलेल्या मिरचीचे उत्पन्न दीड ते दोन टन शेतकऱ्याला मिळू शकते.

ही जात मावा, कोळी या किडींना तसेच डायबॅक आणि विषाणूजन्य रोगांना प्रतिकारक आहे.

संकेश्वरी -३२ –

या जातीची झाडे ही उंच असतात.

वाळलेल्या मिरचीचा रंग हा गडद लाल असतो.

या जातीच्या मिरचीच्या साल पातळ असते आणि ती २० ते २५ सेंटीमीटर पर्यंत लांब असते व त्यावर सुरकुत्या असतात.

पुसा ज्वाला –

या जातीची मिरची वजनदार आणि खूप तिखट असतात.

पिकलेली लाल मिरची ही खूप तिखट असते आणि ती मसाल्यासाठी वापरली जाते.

मुसळवाडी –

या जातीची झाडे उंच असतात

खरीप हंगामासाठी ही जात चांगली आहे.

या जातीच्या मिरची बोकड्या आणि डायबॅक या रोगांना कमी प्रमाणात बळी पडतात.

पंत सी-१

पंत सी वन या जातीच्या मिरच्यांचे उत्पादन हे दोन्ही साठी चांगले होते. म्हणजेच हिरव्या व वाळलेल्या मिरच्या यांसाठी या जातीचे उत्पादन हे खूप चांगले मिळते.

या जातीची फळे उलटी असतात.

फळे आठ ते दहा सेंटिमीटर लांब असून याची साल जाड असते.

या मिरचीतील बियांचे प्रमाण हे खूप अधिक प्रमाणात असते.

या जातीच्या मिरच्या ह्या बोकड्या रोगास प्रतिकारक आहेत.

या प्रकारच्या मिरच्या पिकल्यानंतर खूप आकर्षक म्हणजेच खूप लाल रंगाच्या दिसतात.

मिरची पिकाचे खत आणि पाणी व्यवस्थापन कसे करायचे ?

मिरची पिकाचे खत व्यवस्थापन –

मिरची पिकाच्या कोरडवाहू पिकासाठी दर हेक्‍टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद हे जमिनीत घालावे

ओलिताच्या मिरची पिकासाठी दर हेक्‍टरी ५० किलो पालाश, ५० किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद हे जमिनीला द्यावे.

यापैकी स्फुरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोपांच्या लागवडीच्यावेळी जमिनीला द्यावी. उर्वरित नत्राची अर्धी मात्रा शिल्लक राहते ती मात्रा रोपांच्या लागवडीनंतर ३० दिवसांनी मिरची पिकास मिरची पिकाला बांगडी पद्धतीने द्यावी.

मिरचीला वेळेवर कोळपणी व खते दिल्याने रोपांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे होते.

मिरची पिकाचे पाणी व्यवस्थापन –

जर बागायती मिरची असेल, तर लागवडीच्या जमिनीप्रमाणे मिरची पिकाला पाणी द्यावे.

मिरची पिकाला प्रमाणापेक्षा जास्त ही पाणी देऊ नये आणि कमी पाणी देऊ नये

मिरचीची झाडे फुलावर आणि फळावर आले असताना, झाडांना पाण्याचा ताण द्यावा.

रोपे लावणीनंतर दहा दिवसात शेतात रोपांचा जम बसतो. या काळात एक दिवसाआड हे रोपांना पाणी द्यावे.

त्यानंतर एक आठवड्यात किंवा पाच दिवसांच्या अंतरानं मिरची पिकाला पाणी द्यावे.

जर तुम्ही मिरची मिरची लागवड हिवाळ्यात करत असाल, तर हिवाळ्यात १०-१५ दिवसांच्या अंतराने मिरची पिकाला पाणी द्यावे.

जर तुम्ही लागवड उन्हाळ्यात करत असाल, तर सहा ते सात दिवसांच्या अंतराने झाडांना पाणी द्यावे.

प्रति हेक्टर मिरचीचे उत्पादन किती निघते ?

बागायती हिरव्‍या मिरच्‍यांचे उत्पादन हेक्‍टरी ८०-१०० क्विंटल मिळते. तर कोरडवाहू मिरचीचे उत्‍पादन ६ ते ७ क्विंटल येते.

वाळलेल्‍या लाल मिरच्‍यांचे उत्‍पादन ९-१० क्विंटल निघते.

मिरचीच्या पिकाची अंतर मशागत कशी करावी?

२०-२५ दिवसांनंतर पहिली खुरपणी करावी.

शेत तण विरहित ठेवण्याचा प्रयत्न करावा.

लागवडीनंतर दोन ते तीन आठवड्यांनी खरीप मिरचीला मिरचीचा रोपांना भर द्यावी.

मिरची पिकाची तोडणी कधी करायची?

लागवडीनंतर साधारण अडीच महिन्यांनी मिरचीची पहिली तोडणी सुरू करावी.

झाडांची पूर्ण वाढ झाल्यानंतर दहा दिवसांच्या अंतराने मिरचीची तोडणी करावी.

साधारणपणे तोडणी सुरु झाल्यानंतर तीन महिने तोडे सुरू राहतात. अशा प्रकारे या तीन महिन्यांमध्ये आठ ते दहा मिरचीचे तोडे हे सहज होतात.

वाळलेल्या मिरची साठी त्या पूर्ण झाडावर पिकून गेल्यानंतर त्यांची तोडणी सुरु करावी.

Scroll to Top