S R Dalvi (I) Foundation

वसा सावित्रीचा, सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा..

Vasa Savitricha, the honor of the Daughters of Maharashtra…

“झेलूनिया अंगावरती
शेना मातीची घान |
दिले विद्येचे ज्ञान
लेकी कराया सज्ञान |”

स्त्री अबला नसून सबला आहे, हे आज कर्तृत्ववान स्त्रियांनी सिद्ध केले आहे. पोस्टमनपासून ते पंतप्रधानापर्यंत सर्वच क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. सर्वांनाच अभिमान वाटावा, असेच स्त्रीचे कर्तृत्व आहे. या साऱ्याचे श्रेय अर्थातच सावित्रीबाई फुले यांना आहे. शंभर-दीडशे वर्षांपूर्वीच्या काळात स्त्रियांना शिक्षणापासून वंचित राहावे लागत असे. अशा काळात फुले दाम्पत्याने क्रांतिकारक कार्य केले. आपल्या पतीच्या पावलांवर पाऊल ठेवून त्यांच्या कार्यात सहभागी होणाऱ्या सावित्रीबाई! मुलींसाठी शाळा काढून मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करणाऱ्या सावित्रीबाईंचा जन्मदिवस आपण ‘बालिका दिन’ म्हणून साजरा करतो. सुमारे 1831 साली नायगाव येथील खंडोजी पाटील यांच्या घरात सावित्रीबाईंचा जन्म झाला. सावित्रीबाई लहानपणापासूनच चुणचुणीत, हुशार नि बंडखोर विचारांच्या होत्या. तो काळ मागासल्या विचारांचा होता. रूढी, प्रथा यांना महत्त्व दिले जात असे. बालविवाह सर्रास होत असत. चूल आणि मूल हेच स्त्रीचे कार्यक्षेत्र होते. अशा काळात जन्म झालेल्या सावित्रीबाईंना समंजस व शिक्षित पती मिळाला. त्यांच्या प्रेरणेने सावित्रीबाईंच्या जन्माचे सोने झाले.

सावित्रीबाई हुशार होत्या. त्यांना शिकण्याची आवड व इच्छा होती. ती इच्छा त्यांच्या पतीने म्हणजेच जोतीराव फुले यांनी पूर्ण केली. सावित्रीबाईंचे ते गुरु बनले. सावित्रीबाईदेखील उत्तम शिष्या बनल्या. त्या जिज्ञासेने व कुतूहलाने शिकत होत्या. काल शिकविलेले आज त्या धडाधडा म्हणून दाखवीत. रोज नवीन काहीतरी शिकत. त्यांची प्रगती वाखाणण्यासाठी होती. हातात पुस्तक पडले, की लगेचच त्या ते वाचून काढत. वाचन, पाढे, बेटीज, वजाबाकी, हिशेब, इतिहास, भूगोल, सामान्यज्ञान शिकत. त्यांचा शिक्षणाचा ध्यास व झपाटा विलक्षण होता. लवकरच त्यांनी चौथीची परीक्षा दिली व त्यात उत्तम यश संपादन केले. ‘जिच्या हाती विद्येची दोरी, ती जगाला उक्त त्यांनी खरी करून दाखवली. जोतीराव म्हणत असत “एक स्त्री शिकली की एक कुटुंब शिकते. अशी अनेक कुटुंबे शिकली, का समाज शिक्षित होतो. समाज शिक्षित झाला, की राष्ट्र शिक्षित होते.” जोतीरावांनी चांगल्या कामाची सुरुवात स्वत:च्या घरापासूनच केली. स्वतःच्या पत्नीला शिकवून त्यांनी समाजापुढे एक आदर्श घालून दिला. समाजानेदेखील या आदर्शाप्रमाणे पाऊल पुढे टाकावे, अशी त्यांची इच्छा होती.

1848 साली भिडे वाड्यात त्यांनी पतीच्या प्रेरणेने मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका होण्याचा पहिला मान त्यांना मिळाला. सुरुवातीला मुलींची संख्या कमी होती. प्रवाहाच्या दिशेने पोहणारे सगळेच असतात; पण प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पोहण्यासाठी धैर्य लागते. हळूहळू हे धैर्य वाढू लागले. मुलींची संख्या वाढू लागली. सनातनी लोकांना ही गोष्ट पटली नाही. त्यांनी कडाडून विरोध करण्यास सुरुवात केली. ‘कलियुग आले, धर्म बुडाला,’ अशी टीका होऊ लागली. तरीही हे सारे शांतपणे सहन करीत त्या आपले कार्य नेटाने पुढे नेत असत. विघ्नसंतोषी माणसे त्यांना खूप त्रास देत; पण तो त्रास सहन करीत त्या प्रत्युत्तरादाखल म्हणत, “हे पवित्र कार्य मी सतत करावे म्हणून तुम्ही शेण, खडे मारत नसून माझ्यावर फुलेच उधळीत आहात, असेच मला वाटते.’ सावित्रीबाईंची जिद्द, चिकाटी, धाडस पाहून जोतीरावांना आनंद होत असे. त्यांची स्त्री-शिक्षणाची इच्छा पत्नीकडून पूर्ण होत आहे, हे पाहून त्यांना समाधान वाटत असे.

त्या काळातील महिला रूढी-परंपरा यांच्या गुलामगिरीत जखडल्या होत्या. त्यांची या गुलामगिरीतून मुक्तता करण्याचा त्यांनी चंगच बांधला. प्रयत्नांची शिकस्त केली. महिलांच्या विकासासाठी त्यांनी महिला सेवा मंडळा’ची स्थापना केली. केशवपनाविरुद्ध बंड केले. नाभिकांचा संप घडवून आणला. ‘बालहत्या प्रतिबंधक गृह सुरु करून त्यांनी अडल्यानडल्या आणि वाट चुकलेल्या विधवांचे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचविले. दुष्काळ, प्लेग या साथीच्या काळात रंजल्या-गांजल्यांची सेवा केली आणि अन्नछत्रे चालविली. अशा प्रकारे सावित्रीबाई क्रांतिज्योत बनल्या. स्त्री-जीवनात क्रांती घडविणाऱ्या, ज्ञानज्योत प्रज्वलित करणाऱ्या सावित्रीबाई समाजापुढे आदर्श होत्या. स्वतः शिकून स्त्रीपुरुष समानतेचा पाया घालणाया, दलित बांधवांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या, स्त्रियांच्या प्रतिष्ठेसाठी झटणाऱ्या क्रांतिज्योतीला शतशः प्रणाम !

Scroll to Top