S R Dalvi (I) Foundation

शिक्षकांचे महत्त्व.

Importance of Teachers

लोकांना वाटते की आजच्या पिढीमध्ये शिक्षकांचे महत्त्व राहिले नाही, कारण शिक्षक जे काही सांगू शकतो ती माहिती इंटरनेट वर उपलब्ध असते. परंतु शिक्षकाची मानव घडवण्यात, समाज, राष्ट्र आणि संपूर्ण जग घडवण्यात महत्त्वाची भूमिका असते. शिक्षकाचे काम मुख्यत्वे विद्यार्थ्याला माणूस म्हणून प्रेरित करणे आणि वाढवणे हे असते. शिक्षक हे फक्त टेपरेकॉर्डर नाहीत जे काहीतरी वाचतात आणि काही माहिती तुमच्यापर्यंत होहचवतात. शिक्षक म्हणजे एक अशी व्यक्ती आहे जी विद्यार्थ्याला विशिष्ट मार्गाने प्रेरित करून त्यांचे जीवन घडवत असते. 

मुख्यत्वे अनेक मुलांना, कोणता शिक्षक एखादा विषय शिकवत आहे हे ठरवते की त्यांना तो विषय आवडतो की नाही. विद्यार्थ्याची शिक्षकांशी ओळख झाली, शिक्षक पुरेसा प्रेरणादायी असेल तर तो विषय मुलांसाठी मनोरंजक बनतो.  मुलांची क्षमता वाढवण्याच्या आणि एखाद्या विशिष्ट विषयात मुलाची आवड निर्माण करण्याच्या प्रक्रियेत शिक्षक नक्कीच मोठी भूमिका बजावतात.

विद्यार्जन करणारे विद्यार्थी आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचे संबंध जिव्हाळ्याचे असायला हवेत. तसेच मजबूत समाज घडविण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांचा मिळून भक्कम सेतू बांधण्याची आवश्यकता आहे. आजच्या माहितीयुगात विद्यार्थी आणि सातत्याने शिक्षक असल्यामुळे शिक्षकांनी आपली कार्यतत्परता वाढवली पाहिजे. शिक्षकांनी ग्रंथालयात जाऊन अत्याधुनिक पुस्तके, मासिके यांचा उपयोग करून आपली ज्ञानलालसा सतत जागृत ठेवली पाहिजे. जो रात्रंदिवस ज्ञान मिळविण्यासाठी धडपडतो आणि विद्यार्थ्यांना ज्ञान देतो, तोच खरा तळमळीने कार्य करणारा शिक्षक असतो आणि तिच त्याची खरी कर्तव्यपरायणता असते. आपल्या वाट्याला आलेले कार्य कुशलतेने, आनंदीवृत्तीने, बिनचूकपणे, वेळेत, नियमांच्या अधीन राहून करायला हवे.

आज शिक्षकांना शैक्षणिक कामाव्यतिरिक्त अनेक कामे करावी लागतात. जनगणना, रेशनकार्ड तसेच इतर सर्व्हेक्षण करणे, सतत निवडणुकांची कामे यामुळे शिक्षकांच्या शैक्षणिक कार्यात व्यत्यय येऊन ते यथायोग्य पार पडत नाहीत. तसेच एका वर्गामध्ये मुलांची भरमसाट संख्याही काही शिक्षकांसमोरील मोठी समस्या आहे.

अनेक शिक्षकांना त्यांच्या शिक्षणकार्यात अडथळा बनणारा समाज आणि शासनाशी लढावे लागते. तेव्हा काही शिक्षक समाज आणि शासनाला अनुकूल राहून कार्य करतात. अन्यथा राजकीय दबावामुळे अनेक शिक्षकांच्या बदल्या लांब ठिकाणच्या त्रासदायक ठिकाणी होतात. अनेक पालकांना आणि वरिष्ठ अधिकार्‍यांना कळत नाही की, शिक्षकांचे काम किती अवघड आहे. शैक्षणिक जीवनात शिक्षकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

Scroll to Top